Skip to content
आपुलकी संस्थेची ध्येय व उद्दिष्टे
-
महाराष्ट्रातील अनाथालय व निरीक्षण गृहातील वय वर्षे १८ / २१ नंतर बाहेर पडणाऱ्या वंचित मुलांचे पुनर्वसन करणे. ज्यांना काही नाही त्यांना सर्व काही मिळवून देणे.
-
सुस्थिती प्राप्त केलेल्या सेवाभावी मुला-मुलींचे संघटन करणे व निवासी संस्थांमधून बाहेर पडलेल्या लाभार्थीची सद्यस्थिती जाणून घेणे.
-
संस्थास्थित मुला-मुलींसाठी कार्यशाळा नियोजन करणे.
-
महिला व बाल विकास अधिकारी / कर्मचारी वर्ग व संस्थांतर्गत मुले-मुली यांच्यामध्ये सामंजस्यपूर्ण संबंध व नाते प्रस्थापित व्हावे यासाठी मध्यस्थाची भूमिका स्वीकारणे तसेच अन्यायकारक परिस्थितीमध्ये मुलांच्या हितासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे. (समन्वयक म्हणून संस्था कार्यरत आहे.)
-
संस्थांतर्गत मुलांसाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनांचा अभ्यास करुन त्या मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी सतत पाठपुरावा करणे व त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे.
-
व्यवसाय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन व आर्थिक मदत करणे.
-
वंचितांसाठी रोजगाराच्या संधींचा सतत मागोवा घेणे व त्यांना रोजगार मिळवून देणे, मार्गदर्शन करणे. मानसिक दौर्बल्य व गुन्हेगारी वृत्ती यापासून मुले दूर राहावीत यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणे.
-
महाराष्ट्रातील विविध समित्या उदा. बाल कल्याण समिती, बाल हक्क समिती, राज्य निवड मंडळ इ. वर संस्थेमधून वाढलेल्या कर्तबगार व्यक्तींची महिला व बालविकास अंतर्गत बालकांशी निगडीत सर्व समित्यांवर नियुक्ती प्राधान्याने व्हावी यासाठी शासनाकडे आग्रही भूमिका मांडणे.
-
माजी विद्यार्थ्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हावार समिती स्थापन करणे.
-
कायद्याच्या चौकटीत बसतील असे धर्मादाय स्वरुपाचे विविध उपक्रम संस्थेमार्फत यशस्वीरित्या राबविणे.
-
वंचित मुला-मुलींना स्वत:चे घर मिळावे यासाठी दत्तक योजनेचा प्रचार, प्रसार करुन दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करणे.
-
नैसर्गिक, सामजिक आपत्ती मध्ये सापडलेल्या महिला, मुले तसेच दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करणे. कौटुंबिक समस्यांबाबत त्यांना प्रसंगानुरुप सहाय्य करणे.
-
ग्रुप होमची निर्मिती करुन निवासाची सोय करणे.